vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

राज्य प्रतिनिधी –

रेल्वे मार्गांवरील देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी दिनांक रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात येतील तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुलुंड ते माटुंगा दरम्यानच्या अप जलद मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात अप जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या गाड्या ठाणे ते माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील आणि प्रवासाचा कालावधी वाढू शकतो.वाशी ते सीएसएमटी या दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील. विशेषतः पनवेलमार्गे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा परिणाम भोगावा लागू शकतो.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा, रेल्वे स्थानकांवरील सूचना व अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि यामध्ये सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा अथवा बस, मेट्रो, किंवा अन्य पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा वापर करावा. काम पूर्ण झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

संबंधित पोस्ट

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

*नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी राज्यस्तरीय ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta