vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..

जालना,  (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे लोकप्रिय व दूरदृष्टीचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच जालना जिल्ह्याच्या कार्यसमर्पित पालकमंत्री मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भव्य महा रक्तदान अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या महाअभियानाचे नेतृत्व भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व “एक थेंब रक्त, एक जीव वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हे रक्तदान शिबिर राबविले जात आहे. हे शिबिर गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.22 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत नवीन जालना मंडळाचे शिबिर भाजपा कार्यालय, जालना येथे व ग्रामीण जालना मंडळाचे शिबिर नाव्हा, ता. जालना येथे होणार आहे. 23 जुलै रोजी पूर्व जालना मंडळाचे शिबिर रुपम हॉल, हॉटेल मधुबनच्या मागे, छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना येथे, तर 24 जुलै रोजी जुना जालना मंडळाचे शिबिर काळुंका माता मंदिर संस्थान सभागृह, गांधी चमण, जुना जालना येथे आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान केल्यानंतर प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व आरोग्य खबरदाऱ्या पाळून शिबिरे आयोजित केली जात आहेत. जालना महानगरातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पुण्यकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

काँग्रेस पक्षाला खिंडार; शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, दिल्ली गाठण्याचा इशारा

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

vishwatmaklokswamivarta

19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने“जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन झालेल्याबीडीडी चाळीच्या सदनिकांचे #चावी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग