vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

राज्य प्रतिनिधी : नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. सर्व संबंधित गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

नागरिकांनी कालवा, नाल्यातून बेकायदेशिर पाणी उपसा (पंपीग) करु नये व पाण्याची नासाडी टाळावी जेणेकरुन सर्व गावांना पाणी मिळणे सोयीस्कर होईल. पाणी टंचाई निवारणासाठी जलसंपदा विभाग कटिबध्द असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे केले जाईल, अशी माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

30 मार्च 2026 च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यासाठी 3.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 4.00 दलघमी व 1 मे 2026 च्या आदेशान्वये 5.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.

विसर्ग व लाभक्षेत्र ,इसापूर धरणातून थेट पाणी सोडण्यास्तव विमोचक नसल्याकारणाने कालवा प्रणालीमधून नियमित कालवा आवर्तनाचे वेळापत्रकाप्रमाणे संयुक्तीक होईल अशा विमोचकाद्वारे 5 एप्रिल 2026 रोजी पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 11 मे 2026 अखेरपर्यत एकूण मागणी 12.00 दलघमी पैकी 6.81 दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले आहे.

तालुकानिहाय गावे,नांदेड जिल्हा- गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, वाटेगाव, हरडफ, धोत्रा, कामारी, पिंपरी, डोल्हारी, सिरपल्ली, सिल्लोड, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, साप्ती, मनुला (बु), म्हाटाळा, पेवा दिघी, घारापुर, पळसपूर, डोल्हारी व विरसणी या गावांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्हा-टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी,दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर व सिंदगी या गावांचा समावेश आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिली.

00000

संबंधित पोस्ट

अमरावती जिल्ह्यासाठी ‘आधारभूत’ खरेदी केंद्रांना मंजुरी;शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापुजा जय जिजाऊ…जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ!

vishwatmaklokswamivarta

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta