vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर..

राज्य प्रतिनिधी -पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत सात हजारांहून अधिक घरे कोसळली आहेत. यामध्ये १३० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित घरांना आंशिक हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आणि मातीची घरे क्षणात कोसळली. अजूनही जिल्ह्यातील अनेक कुटुंबे मातीच्या घरांत राहतात, त्यामुळे पावसाचा फटका त्यांना जास्त बसला आहे.

संबंधित पोस्ट

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

महापालिका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका” — उद्धव ठाकरे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*