vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे

मुंबई, प्रतिनिधी:- चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीच्या काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेण्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले.   विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक्साईड इंडस्ट्रीज व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीस पिंपरी चिचंवड सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, पुणे अतिरिक्त कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, उपायुक्त निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्त गजानन शिंदे, कक्ष अधिकारी संदीप पाटील, एक्साईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापन प्रतिनिधी संतोष चव्हाण आणि कामगार उपस्थित होते.

   उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले की, एक्साईड कंपनीने काढून टाकलेल्या १० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे असे सुचित करताना याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी. एक्साईड कंपनी व्यवस्थापनाने विविध कारणे देऊन काही कामगारांना दोन ते तीन वर्षापासून कामावरून काढून टाकले होते तसेच त्यांना त्याबाबत कोणतीही भरपाई देण्यात आली नव्हती. यामुळे संबंधित कामगार आंदोलन व उपोषण करून त्यांच्या प्रकरणात निर्णय घेण्याबाबत मागणी करत होते. दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याशी समन्वय राखत बैठकीद्वारे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला.

  कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना दुसऱ्या ठिकाणी बदली करुन रुजू होण्याचे सुचविले आहे. परंतू, ते कामगार सेवानिवृत्तीच्या जवळ असल्याने वयोमानामुळे त्यांना इतर ठिकाणी काम करणे शक्य होणार नाही. निर्णय घेताना मागील 2 वर्षापासून त्यांना कामावरुन काढले असल्याने त्यांच्या अडचणी व आर्थिक नुकसानीबाबत देखील विचार केला जावा असे उपाध्यक्ष श्री बनसोडे यांनी सांगितले      यावेळी बैठकीमध्ये कामगार विभागाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांनी माहिती दिली

000000

संबंधित पोस्ट

जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाची व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

1 सप्टेंबर रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन 

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*

ठाणे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 47.32 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी फसवणुकीचा लावला छडा ; मुख्य सूत्रधाराला केली अटक