vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवात कोकण रेल्वेचा गोंधळ – विशेष गाड्या उशिरा

गणेशोत्सवात कोकण रेल्वेचा गोंधळ – विशेष गाड्या उशिरा ,एसटी बस स्थानकांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मोठा त्रास..

राज्य प्रतिनिधी-

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या  प्रवासाला मोठा ब्रेक लागला आहे. कोकण रेल्वे आणि एसटी बस स्थानकांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोकण एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत असून, कुर्ला, स्वारगेट आणि अन्य प्रमुख ठिकाणी विशेष बसेस सुरू केल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे काही ठिकाणी रेल्वे आणि बस दोन्हीवर विलंब झाला आहे. कुर्ला नेहरूनगर एसटी आगाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांनी लालपरीबसला प्राधान्य दिले आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ठाणे रेल्वे स्थानकावर मडगाव-मांडवी एक्सप्रेस उशिरा पोहोचत आहे ज्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

पुण्यात गणेशोत्सव काळात केंद्रभागातील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ वा कुंभाखेस चौक मार्गे प्रवास करावा लागेल. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी जंगली महाराज रोडचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे

पुणे आणि त्याच्या आसपासच्या गावांमधून रात्रीच्या वेळेत प्रवाशांसाठी अतिरिक्त ७८८ बसेस सोडल्या जाणार आहेत. रात्री १२ नंतर बससाठी तिकीटदरामध्ये १० रुपये वाढ होणार असून, रात्री १२ नंतर बस पास मान्य केले जाणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

संबंधित पोस्ट

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सर्व प्रक्रिया कालबद्ध व पारदर्शकपणे पूर्ण करा- विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन