vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एकही पैसा परत जाता कामा नये. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, यंत्रेणेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा चांगला वापर करणे गरजेचे आहे. काम झालेल्या ठिकाणांचे जिओ टॅगींग छायाचित्रे सादर करावेत. काम अपूर्ण राहिले असल्यास त्याची इत्यंभूत माहिती घेवून बैठकीस हजर राहणे आवश्यक आहे. निधी दिल्यानंतर वेळेत निधी खर्च व्हायला पाहिजे. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम करण्यासाठी नेहमी उत्साही रहावे. तसेच चुकीची कामे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत त्यामुळे नियमानूसार कामे वेळेत करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सन 2024-25 खर्चाचा आढावा, सन 2025-26 नियोजनाबाबत, अखर्चित निधीबाबत माहिती, स्पिल कामांच्या याद्या व आवश्यक निधी , सन 2024-25 पर्यंत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आता प्रत्येक कामांना युनिक आयडी देण्यात येणार असल्याचेही नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय-सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी..

सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर

जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च