vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एकही पैसा परत जाता कामा नये. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, यंत्रेणेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा चांगला वापर करणे गरजेचे आहे. काम झालेल्या ठिकाणांचे जिओ टॅगींग छायाचित्रे सादर करावेत. काम अपूर्ण राहिले असल्यास त्याची इत्यंभूत माहिती घेवून बैठकीस हजर राहणे आवश्यक आहे. निधी दिल्यानंतर वेळेत निधी खर्च व्हायला पाहिजे. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम करण्यासाठी नेहमी उत्साही रहावे. तसेच चुकीची कामे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत त्यामुळे नियमानूसार कामे वेळेत करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सन 2024-25 खर्चाचा आढावा, सन 2025-26 नियोजनाबाबत, अखर्चित निधीबाबत माहिती, स्पिल कामांच्या याद्या व आवश्यक निधी , सन 2024-25 पर्यंत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आता प्रत्येक कामांना युनिक आयडी देण्यात येणार असल्याचेही नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र; कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशिकारी टोला येथे कृषी विभागाचा पुढाकार; पाण्याची बचत, मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी ११ व १३ एप्रिलला शिबिराचे आयोजन

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

नदीपात्रातून अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणी ५६ कोटी ६८ लाखांचा दंड;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोषी अधिकारी निलंबित— महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे