vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

राज्य प्रतिनिधी –

देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. संसदीय परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी, संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी उपराष्ट्रपतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा देशाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, श्री. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला विजय ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. श्री. राधाकृष्णन यांचा हा विजय ‘एनडीए’च्या एकजुटीचा आणि लोकांच्या केंद्र सरकार वरील विश्वासाचा, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विजय आहे. देशातील लोकशाही संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी ते निश्चितच योगदान देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

***

संबंधित पोस्ट

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे — ✅ ‘उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन ✅ ‘चक्र’ (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) चे उदघाटन

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे; अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल – विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण