vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशभरात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता ,सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशभरात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता ,सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य प्रतिनिधी

देशभरात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात. अनेक वेळा त्यांचा शोध घेण्यासाठी पालकांना पोलिस ठाणे, न्यायालये आणि विविध विभागांची दारं ठोठवावी लागतात. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने स्पष्ट केले की, बेपत्ता होणाऱ्या मुलांची संख्या चिंताजनक आहे. यामागे अपहरण, मानवी तस्करी, बालमजुरी, गुन्हेगारी टोळ्या यांसारख्या गंभीर कारणांचा समावेश असू शकतो. अशा वेळी मुलांचा मागोवा घेण्यासाठी आणि संबंधित माहिती एकत्र करण्यासाठी सक्षम तांत्रिक प्रणालीची गरज आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला विशेष पोर्टल तयार करण्याचे आदेश दिले. या पोर्टलवर बेपत्ता मुलांची माहिती त्वरित नोंदवता येईल. संबंधित राज्य पोलिस, बालसुरक्षा संस्था आणि न्यायालयीन यंत्रणा या सर्वांना एका व्यासपीठावर एकत्र आणून समन्वय साधला जाईल. यामुळे मुलांचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी होईल.

या पोर्टलमुळे बेपत्ता झालेल्या मुलांच्या पालकांना थेट माहिती मिळवणे आणि तक्रारींची स्थिती जाणून घेणे सोपे होईल.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व जमातीतील मृतांच्या १०८ वारसांना लवकरच शासकीय नोकरीचा आदेश ; प्रक्रिया अंतिम टप्प्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागीय दक्षता समितीच्या बैठकीत माहिती

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta