vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यमंत्री भारती पवार

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यमंत्री भारती पवार

प्रतिनिधी नवी दिल्ली देशात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. दररोज ४० हजारांच्या आजपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दोन लशींचा डोस एकत्र करुन ती नागरिकांना देण्याची चर्चा देशात सुरु झाली होती. याबाबत सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रविण पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नावर लिखित स्वरुपात याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना प्रतिबंधक लशी नुकत्याच विकसित झाल्या आहेत. विविध लशींचे डोस एकत्र करण्याचे वैज्ञानिक प्रमाण नाही, शिवाय यावर अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय आरोग्य सल्लागार समुहाने आणि कोविड-१९ च्या लसीकरणावरील राष्ट्रीय तज्त्र गटाने लशीचे डोस मिक्स करण्याची शिफारस केली नाही, असं भारती पवार संसदेत म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने आणि इतर कोणत्या तज्त्र गटाने लशींचा डोस मिक्स करण्याची शिफारस केलेली नाही. त्यामुळे तुर्तास याबाबत कसलाही विचार नसल्याचे भारती पवार यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतात, एका धर्माचे नव्हे – इलाहाबाद उच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवावी, शौचालये दुरुस्ती डागडुजीला शासन करणार सर्व मदत’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई पोलीस दलात  कंत्राटी पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू, 25 सप्टेंबर पासून नेमणूक…

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी संजय राऊत यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ, ‘या’ तारखेपर्यंत मुक्काम वाढला

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार..जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन