vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

*ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

सातारा प्रतिनिधी.- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ ताण तणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री.ए.एस. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सातारा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निना. नि. बेदरकर, आंतरराष्ट्रीय योगाचे समुपदेशक तज्ञ डॉ. धनश्री पाटील, सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे व वर्षा खोचे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. धनश्री पाटील यांनी दैनंदिन कामातून येणा-या ताणाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे, शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले कसे राखावे आणि शारिरीक, मानसिक आरोग्य आणि रोजचे दैनंदिन कामकाज यामध्ये समतोल कसे साधावे या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे आणि वर्षा खोचे यांनी ऑनलाईन फ्रॉड, डिजीटल फसवणूक, डिजीटल अरेस्ट, अशा अनेक सायबर सुरक्षेविषयी येणा-या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अड, सुचिता पाटील, सहाय्यक विधी सहाय्य बचाव सल्लागार यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालय, सातारा येथील कार्यरत महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

000

संबंधित पोस्ट

उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पाणी आरक्षणास मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम २०२५ पीकस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

vishwatmaklokswamivarta