vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

राज्य प्रतिनिधी-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने सरकारने एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी इतकी मदत निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. मात्र, या निधीतून आतापर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम खूप कमी आहे. सध्या फक्त नऊशे कोटी इतकीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. जमा झालेला निधी अपेक्षित निधीच्या तुलनेत अत्यल्प आहे आणि या विलंबामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

निधी विलंबात ई-केवायसी प्रक्रिया मुख्य अडथळा ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खात्यावर अनुदान जमा होण्यात अडथळा येतो आहे. शेतकऱ्यांकडे शेती फार्मर आयडी असूनही ई-केवायसी जलद झाली नाही. याशिवाय नुकसानमापन, निर्धारित निकष, आणि निधी हस्तांतरण यांच्यामध्ये वेळ लागत असल्याचा दिसतो आहे.

शेतकरी समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

यशकथा-बँक सखी ते लखपती दीदींची आधारस्तंभ: कावेरी जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द