मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आता दहापदरी होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील कमी होण्याची अपेक्षा आहे. खासकरुन, सुट्ट्यांच्या काळात, कोंडी दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
या मार्गावर दरवर्षी वाहतुकीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ होत आहे. वाढलेल्या मार्गामुळे वाहतुकीची क्षमता वाढेल, त्यामुळे मालवाहतुकीसाठी, लोकांना प्रवासासाठी व पर्यटनासाठी मार्ग सुगम होईल. चौदा हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून पूर्ण केला जाईल. सध्या तेरा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे, ज्यामध्ये खंडाळा घाटातील दहापदरी पदरी भाग समाविष्ट आहे. आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी वाहतुक कोंडीमुळे प्रवासाच्या तासांत अजून एका तासाची वाढ व्हायची. पण ही समस्या या विस्तारीकरणामुळे सुटणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईल.