vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

राज्य प्रतिनिधी-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने सरकारने एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी इतकी मदत निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. मात्र, या निधीतून आतापर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम खूप कमी आहे. सध्या फक्त नऊशे कोटी इतकीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. जमा झालेला निधी अपेक्षित निधीच्या तुलनेत अत्यल्प आहे आणि या विलंबामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

निधी विलंबात ई-केवायसी प्रक्रिया मुख्य अडथळा ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खात्यावर अनुदान जमा होण्यात अडथळा येतो आहे. शेतकऱ्यांकडे शेती फार्मर आयडी असूनही ई-केवायसी जलद झाली नाही. याशिवाय नुकसानमापन, निर्धारित निकष, आणि निधी हस्तांतरण यांच्यामध्ये वेळ लागत असल्याचा दिसतो आहे.

शेतकरी समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

संबंधित पोस्ट

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचे काटेकोर नियोजन करावे – दीपेंद्र सिंह कुशवाह

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉