vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरा जपणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.

या महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन)या उपक्रमांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती तसेच युवा मंडळांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ५ वाजेपर्यंत आपली online नोंदणी dscraigad.2009@rediffmail.com या ई-मेलद्वारे करावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, प्रकाश वाघ यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त.

vishwatmaklokswamivarta

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

vishwatmaklokswamivarta

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta