vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरा जपणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.

या महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन)या उपक्रमांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती तसेच युवा मंडळांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ५ वाजेपर्यंत आपली online नोंदणी dscraigad.2009@rediffmail.com या ई-मेलद्वारे करावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, प्रकाश वाघ यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात यावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये दंत पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार

नैसर्गिक संसाधनांवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचाच : पालकमंत्री संजय राठोड

जात वैधता प्रमाणपत्रे अनाधिकृत आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई, शिक्षा…

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर