vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंतमतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध

शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंतमतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध

 अमरावती , प्रतिनिधी) :भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानुसार नमुना क्रमांक 19 व्दारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 असा आहे.

 त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी नमूना क्रमांक-19 मधील अर्ज भरण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर लॉगीन करून पात्र शिक्षकांना आवश्यक त्या पुरावा कागदपत्रांसह दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

 त्याप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक-19 मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन दाखल करण्याची कार्यपध्दतीही मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत सुरु आहे.

 उपरोक्त सुविधेबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी व पात्र शिक्षकांनी आपले अर्ज अंतिम दिनांकापर्यंत सादर करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ गोविंद दानेज यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

vishwatmaklokswamivarta

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज…

भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन.