vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

 अमरावती, प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात करण्यात आली.

सदर सप्ताह दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर रोजीच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येतो. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ या घोषवाक्यावर आधारीत राहणार आहे. सप्ताहाची सुरुवात सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी सप्ताहानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाला लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे आदी उपस्थित होते. जनजागृती उपक्रमात अमरावती शहरातील बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भिंतीपत्रके लावण्यात आली. तसेच नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. दक्षता जनजागृती सप्ताहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचारासंबंधाने काहीही तक्रार असल्यास भ्रष्टाचार विरोधी तक्रारीसाठी फोन क्रमांक ०७२१/२५५३०५५ किंवा ०७२१/२६६४९०२, टोल फ्री क्रमांक : १०६४, व्हॉट्सॲप क्रमांक: ७५१७५७१०६४ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta