vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात तातडीने मदत कार्य करण्यासाठी माजी सैनिकांच्या अनुभवाचा वापर करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आपदा प्रशिक्षण 9 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी होणाऱ्या सर्व माजी सैनिकांची राहण्याची (निवासी), चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक आपदा मित्राला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी माजी सैनिकाचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे दि. 27 जानेवारी 2026 पर्यंत ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्डसह अर्ज विहित मुदतीत सादर करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक योगदान द्यावे – एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न- संयुक्त पथकाने दर महिन्याला तपासणी करावी- कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

बदलापूर घटना : चकमक प्रकरणात ५ पोलीस दोषी, बंदुकीवर आरोपींच्या बोटांचे ठसे सापडले नाहीत…

vishwatmaklokswamivarta

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा : महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार