vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे नागरिकांना व वकिलांना सुलभ, जलद व पारदर्शक सेवा मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-सेवा व नक्कल कॉपी कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी श्रीमती सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-1, श्रीमती एस.आर.तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2, तसेच एच. डी. भगत, जिल्हा न्यायाधीश-3, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे उपस्थित होते. याशिवाय जिल्हा न्यायालयातील सर्व माननीय न्यायाधीश, न्यायिक अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

तसेच या कार्यक्रमाला वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.डी.पाटील,सचिव अ‍ॅड.अमित देशमुख यांच्यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील, न्यायालय व्यवस्थापक महेश दायमा उपस्थित होते.ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राच्या माध्यमातून आता न्यायालयीन कागदपत्रांच्या नक्कल प्रती, अर्ज, विविध सेवा अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने मिळणार असून नागरिकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता येऊन न्यायप्रणाली अधिक सक्षम होईल असे मत जिल्हाप्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे न्यायालयीन कामकाज अधिक आधुनिक,गतिमान व नागरिकाभिमुख होण्यास मोठी मदत होणार असून न्याय प्रक्रियेत विश्वास वाढण्यास हातभार लागेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला

0000000

संबंधित पोस्ट

कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यासाठी कुरण निर्मितीस प्राधान्य- वनमंत्री गणेश नाईक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा-आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश’नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवादसातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम,प्रत्येक अडचण सोडवून योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हाधिकारी वर्षा मीना

vishwatmaklokswamivarta