vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

 

     नवी मुंबई, प्रतिनिधी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. 28 व 01 मार्च रोजी खारघर नवी मुंबई येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची अंतिम टप्प्यातील पाहणी आणि आढावा आज कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन घेतला.

  यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर आयुक्त फरोग मुकादम, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हिंद दी चादर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कामांसाठी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला

    यावेळी पनवेल महानगपालिकेने या समागम कार्यक्रमासाठी देश व राज्य भरातून येणाऱ्या भाविकांना वाहनतळ आणि निवास व्यवस्थेविषयी सुलभतेने माहिती मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या हिंद दी चादर मोबाईल ॲप बद्दल माहिती देण्यात आली. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली असेल

vishwatmaklokswamivarta

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

vishwatmaklokswamivarta

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास