vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

 

     नवी मुंबई, प्रतिनिधी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. 28 व 01 मार्च रोजी खारघर नवी मुंबई येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची अंतिम टप्प्यातील पाहणी आणि आढावा आज कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन घेतला.

  यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर आयुक्त फरोग मुकादम, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हिंद दी चादर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कामांसाठी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला

    यावेळी पनवेल महानगपालिकेने या समागम कार्यक्रमासाठी देश व राज्य भरातून येणाऱ्या भाविकांना वाहनतळ आणि निवास व्यवस्थेविषयी सुलभतेने माहिती मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या हिंद दी चादर मोबाईल ॲप बद्दल माहिती देण्यात आली. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

ऑपरेशन अभ्यास’ मॉक ड्रिल उद्या 13 मे रोजी नवी मुंबईतील ‘वाशी – सेक्टर 12’ मध्ये

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

vishwatmaklokswamivarta

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई