vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा-महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा-महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. क्रांती चौकापासून सुरु झालेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला.

 महिला या शक्तीचे स्वरुप असतात, गरज आहे ती फक्त महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला.

 आज सकाळी साडेसात वा. क्रांती चौकात महिलांच्या बाईल रॅलीचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकरी प्राथमिक जयश्री चव्हाण तसेच प्रशासनातील महिला अधिकारी – कर्मचारी या रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या. रॅलीत महिला सक्षमीकरणाच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. पैठण गेट, तापडिया रंगमंदिर मार्ग, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत औरंगपुरा भाजी मंडी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. महिला ह्या समाजाचा निम्मा भाग आहे. त्यांची बुद्धिमत्ता, शक्ती याचा उपयोग झाल्यास आपला समाज अनेक क्षेत्रात आघाडीवर जाईल.त्यासाठी महिलांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्याचा विकास करायला हवा,असे प्रतिपादन त्यांनी केले.

 प्रास्ताविक संगिता राठोड ह्यांनी तर आभार आश्विनी लाठकर यांनी मानले.

०००००

संबंधित पोस्ट

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

सन २०३० पर्यंत मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीरोड मॅप तयार करण्याच्या अनुषंगाने होणार कार्यशाळेचे आयोजन कार्यशाळेच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागातील महिलांना भेटवस्तू देण्याचा आरोप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची तक्रार दाखल

vishwatmaklokswamivarta

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला 30 ता स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश