vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यानुषंगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी साडेदहा वा. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे समवेत सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे या उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील कोणतीही तक्रारदार पिडीत महिला कोणतीही पुर्वसुचना न देता सदर स्थानिक पातळीवर थेट जनसुनावणीस उपस्थित राहुन आपली लेखी समस्या / तक्रार आयोगापुढे मांडु शकेल. या जनसुनावणीस पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक असे विविध प्रशासकीय प्रमुख उपस्थित असल्याने तात्काळ कार्यवाही करणे शक्य होते. तरी या जनसुनावणीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तक्रारदार पिडीत महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta