
सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
आरोग्य प्रतिनिधी मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामध्ये माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांनाही हानी होण्याची शक्यता असते. साधारणपणे मार्च ते मे या मान्सून पूर्वकाळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.
लक्षणे- उष्णतेच्या किंवा अति उष्णतेच्या लाटेमुळे चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात. या कालावधीत हवामान बदल होतात व या बदलांमध्येही आरोग्य उत्तम व निरोगी रहाण्यासाठी खालील बाबींचे पालन करा.
काय करावे –
Ø तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे (किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या.)Ø प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.Ø ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरावे आणि लिंबू पाणी, ताक /लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावी.



