vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती यांना स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन 2025-26 करीता जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 576 व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 384 असे 960 चे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण 2 हजार 427 प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणांपैकी एकूण 965 प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या 100 टक्के जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून सूक्ष्म नियोजन करुन सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

    केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 14 व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 14 व खादी ग्रामोद्योग आयोग या अंमलबजावणी यंत्रणेस 06 असे एकूण 34 प्रस्तावांचे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण 146 प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणापैकी एकूण 70 प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या 100 टक्के पेक्षा जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी करण्यात आली आहे.

   तसेच बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड करिता प्राप्त उद्दिष्टांची देखील 100 टक्के पूर्तता केली आहे.

      यासाठी विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी तसेच सर्व बँक क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा बँक समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी कळविले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta