vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत (२०२४-२५) महाराष्ट्र राज्यातील जमिनींच्या पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावत करण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याची या विशेष प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील शेतजमिनींचे मोजमाप आता अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

    राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुके याप्रमाणे एकूण १८ तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून म्हसळा तालुक्याचा यात समावेश असून, प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील पाच गावांपासून या कामाला सुरुवात होणार आहे.

   प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात म्हसळा तालुक्यातील १.मौजे आगरवाडा, २.खरसई, ३.तोंडसुरे, ४.पाभरे, ५.वरवटणे या पाच गावांमध्ये कार्यवाही केली जाईल. या गावांचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

  या मोजणी प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान. “कोर्स (CORS) आणि जीएनएनएस (GNSS) रोव्हर” या प्रणालीच्या साहाय्याने जमिनीचे मोजमाप केले जाईल, “जी.आय.एस (GIS)” आधारित मोजणी करताना संगणक प्रणालीद्वारे क्षेत्राची अचूक गणना केली जाणार असल्याने मानवी चुकांना वाव राहणार नाही. अचूक मोजमापामुळे शेतकऱ्यांचे ७/१२ अधिकार अभिलेख पूर्णपणे अद्ययावत होण्यास मदत होईल.

  याशिवाय या प्रकल्पामुळे जमिनींचे वाटप केवळ पारदर्शकच होणार नाही, तर भविष्यातील जमिनीचे वाद टाळण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून जमिनीचे मूल्य वाढण्यासही हातभार लागेल. तसेच जमिनीचे दस्तऐवज व्यवस्थित झाल्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

   “या प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष मोजणीचे काम लवकरच सुरू होत आहे. म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या जमिनींचे पोटहिस्से करून घ्यावेत आणि आपले अभिलेख अद्ययावत करून घ्यावेत, या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सुनील इंदलकर यांनी केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ  

सुरक्षित अन्नासाठी तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवा- संभाजी अडकुणे

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर