vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांन मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना असून या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपचीसंधी मिळेल. या अंतर्गत युवकांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा ९००० रुपये विद्यावेतन मिळेल. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशा उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठीनोंदणी योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी करावी. या http://pminternship.mca.gov.in पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे संपर्क करावा.

00000

संबंधित पोस्ट

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत-इस्राईल येथे रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

नांदगाव व बखारी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव सादर करावा- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल