vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

 

बुलडाणा, प्रतिनिधी: देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाचे असून शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांचेही कार्य महत्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले

बेंगळुरू येथील श्री श्री रविशंकर विद्या मानववीर ट्रस्टने आयोजित केलेल्या “श्री श्री एज्युकेशन अवॉर्ड्स 2025” चे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी उपस्थित होते.

मंत्री श्री. जाधव म्हणाले की पुरस्कार हे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले. देश का प्रकृती अभियान देशात 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 पर्यंत चांगल्यारितीने राबविल्या गेले. या अभियानात तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तींना त्यांच्या प्रकृती संदर्भाची माहिती देण्याचं काम देशभर केल्या जात आहे. श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारने संपूर्ण देशभर लोकांमध्ये जनजागृती व सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था जागतिक दर्जाची आहे. तणावमुक्त आणि मूल्यावर आधारित शिक्षण देत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आधार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकासावर भर दिला पाहिजे, अस मत ही त्यांनी व्यक्त केले आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.

0000000

संबंधित पोस्ट

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

वाळूसाठे शोधण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*नांदुरा तालुक्यात 1775 ब्रास वाळू जप्त*सिंदखेडराजा, खामगावात टिप्परवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

बदलापुरमधील 25 नगरसेवकांचा शिंदे गटाला पांठिबा, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिकांचाही समावेश…

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.22 मार्च रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta