vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई/दिल्ली प्रतिनिधी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड मोठी आहे शक्ती, जगभरात करोडो लोक करतात त्यांची भक्ती, जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान प्रज्ञासुर्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्ववंदनीय आहेत. त्यांचा मला आशिर्वाद आहे, त्यांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्र सरकारमध्ये तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. मी बौध्द आहे, मी सर्व जाती धर्मीयांना न्याय देण्याचे काम करीत राहणार. मी कुणालाही घाबरत नाही. मुझे नही किसी का डर, क्योंकी मेरे पिछे है बाबासाहेब आंबेडकर असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

 नवि दिल्लीतील मावळणकर सभागृह येथे भारतीय बौध्द संघाच्या वतीनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी, तरुण चुग, समता सैनिक दलाचे ए.आर. जोशी, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय बौध्द महासंघाचे प्रमुख भंते डॉ. संघप्रीय राहुल, लतिका शर्मा, लालसिंह आर्या, राजकुमार आनंद, ज्ञानचंद्र गौतम, मुकेश सिरोही, बी. प्रताप आदि मान्यंवर उपस्थित होते.

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी जगात कुणाचीही जयंती साजरी होत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगात सर्वात मोठया प्रमाणात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान बदलण्याची भाषा कोणी करु नये, हे संविधाना कुणालाही बदलता येणार नाही. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान राहील असे ना. रामदास आठवले म्हंटले आहे

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

आरोग्य, विद्यूत, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठीवाढीव 346 कोटींची मागणी करणार-पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी…