vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी रोजी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यादिवशी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या दिवशी धार्मिक विधी करताना बाहविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अक्षय तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदूश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर तालुका स्तरीय अधिकारी दुरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी दुरदूश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे कमी असणे अनिवार्य आहे.

 त्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याकरिता ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मुख्याध्यापकांनी यावर लक्ष ठवावे. बालविवाह होत असल्यास जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग तसेच चॉईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर तात्काळ कळवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा संर

              रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, गावात किंवा परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना घडणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील विचार व्हावा,महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक