vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी रोजी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यादिवशी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या दिवशी धार्मिक विधी करताना बाहविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अक्षय तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदूश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर तालुका स्तरीय अधिकारी दुरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी दुरदूश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे कमी असणे अनिवार्य आहे.

 त्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याकरिता ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मुख्याध्यापकांनी यावर लक्ष ठवावे. बालविवाह होत असल्यास जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग तसेच चॉईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर तात्काळ कळवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा संर

              रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, गावात किंवा परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना घडणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी नवीन चार दुरुस्ती पथकांची खरेदी

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक ‘टेक वारी’चा ऑनलाईन शुभारंभ