vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

*खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

सातार, प्रतिनिधी- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव येथे चालवण्यात येणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुलीचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 वर्षात प्रवेश देण्याची कार्यवाही सरु झाली आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसुचित जाती, जमाती, वि.जा. भ.ज. आर्थिक दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्ग अनाथ, दिव्यांग असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज कराावेत असे आवाहन गृहपाल, मुलींचे शसाकीय वसतिगृह खटाव यांनी केले आहे. सन 2026-27चे वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाईन अरेज करणयासाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. हायस्कूल विभागासाठी प्रवेशाचा अंतिमत दिनांक 30 जून 2026 व इयत्ता 11 वी 12वी, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा अंतिम दिना्क 15जुलै 2026असा आहे. प्रवेशासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दिव्याद दाखला व अनाथ असल्याचा दाखला इत्यादी कागदपतत्रे आवश्यक आहेत.

सदर वसतगृहात इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 2.5 लाख पेक्षा कमी आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास, भोजन, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बोर्डिंग साहित्य, शैक्षणिक स्टेशनरी व वह्या पुस्तके मोफत परविलीजातात. तसेच प्रवेशितांना दरमाह एक हजार पन्नास रुपये निर्वाहभत्ता दिला जातो तसेच विद्यालय विभागाच्य सर्व व ज्या महाविद्यालयात गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रक्कम दिलीजाते. शैक्षणि्क सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल-१) भव्य परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन,कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली