vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी , प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला जीर्णोद्धार आणि परिसरात प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे तसेच मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र या कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. उपलब्ध करून दिलेल्या विकास निधीमुळे परिसराचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून, जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर या तीर्थक्षेत्राची भव्यता अधिक वृद्धिंगत होईल.

तसेच, वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून, राजस्थानमधील व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार श्री. खताळ म्हणाले, शासनाच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. या विकास प्रक्रियेत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. देवस्थानांच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीमुळे तीर्थक्षेत्र पर्यटनाला गती मिळत असून, भविष्यात हा परिसर विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर च्या वतीने महाप्रशिक्षण अभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न

vishwatmaklokswamivarta

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.

vishwatmaklokswamivarta

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती सोहळ्याचा आरंभ : बुलढाण्यात उसळला शिवसागर..सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ- निवृत्ती महाराज इंदुरीकर

vishwatmaklokswamivarta