vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’ (#MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत ५६ लाख वृक्षांच्या रोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला गती देण्यात येणार आहे. ‘जागतिक वसुंधरा दिन २०२६’ च्या निमित्ताने हा करार करण्यात आला.

याअंतर्गत मिशन लाईफ, सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज, आर्टिस्ट फॉर द अर्थ, मुंबईला ‘सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यातील फ्लॅगशिप उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘ग्रीनिंग महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ३०० कोटी वृक्ष रोपण मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेत केवळ वृक्षलागवडीवरच नव्हे, तर झाडांचे जगण्याचे प्रमाण, देखरेख आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यावर विशेष भर दिला जाणार आहे.#वृक्षारोपण#जागतिकवसुंधरादिन२०२६

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी..

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत