vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मागील २४ तासांमध्ये (१३ जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर ३९.८ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३७ मिमी, सांगली जिल्ह्यात ३६ मिमी आणि नाशिक जिल्ह्यात २५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १०.५, रायगड १५, रत्नागिरी ३७, सिंधुदुर्ग ७१, पालघर २२.२, नाशिक २५.२, धुळे २१.४, नंदुरबार ३.१, जळगाव ९.३, अहिल्यानगर १८.६, पुणे २०.१, सोलापूर १५.७, सातारा २४.२, सांगली ३६.६, कोल्हापूर ३९.८, छत्रपती संभाजीनगर २०.६, जालना २३.६, बीड १०.६, लातूर ६.३, धाराशिव ९.६, नांदेड ४.९, परभणी ८.९, हिंगोली १९.३, बुलढाणा १३.९,

अकोला ८.७, वाशिम १६.७, अमरावती ३.५, यवतमाळ ४.१, वर्धा ३.९., नागपूर ०.३, भंडारा ०.१, गोंदिया ०.१, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली १.४.

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती मृत व एक व्यक्ती जखमी झाली आहे. वीज पडून सांगली जिल्ह्यात दोन व्यक्ती मृत, जालना जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व १२ प्राणी मृत तर एक व्यक्ती जखमी, यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती जखमी, वाशिम जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व चार प्राणी मृत आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून १७ प्राणी जखमी झाले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर दिनांक १२ मार्च रोजी अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI १७१ या विमानच्या अपघातात राज्यातील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

विशेष लेख-स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव…