vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका संचालित घणसोली येथील बेघर निवारा केंद्रास आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथे असलेल्या बेघर स्त्री, पुरूष नागरिकांशी संवाद साधत उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी आयुक्तांनी महिला व पुरूष कक्षामधील बेघर नागरिकांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या खानपान व्यवस्थेचीही पाहणी केली तसेच त्यांची आरोग्य तपासणी वेळेच्या वेळी केली जात असल्याबद्दल माहिती घेतली.

  याठिकाणी असलेल्या बेघर व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार विविध कलागुण जोपासण्याच्या दृष्टीने शिलाईकाम तसेच कलाकुसरीच्या कामाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच वाचण्यासाठी पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. निवारा केंद्राच्या दर्शनी भागात पावसाळ्यापूर्वी शेड तयार करून घ्यावा तसेच बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत अशाही सूचना त्यांनी केल्या. बेघरांची संख्या लक्षात घेऊन आणखी केंद्र सुरू करणेबाबत तपासणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

00000

संबंधित पोस्ट

मा. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारने कठोर अंमलबजावणी केल्यास दलित आदीवासी भूमिहीन कास्तकराचे कास्तपट्टे नियमानूकुलित होतील – अ‍ॅड. भास्कर मगरे

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta