vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, प्रतिनिधी सावेडी परिसरासाठी स्वतंत्र बस स्थानकाची अनेक वर्षांची मागणी होती. या बस स्थानकामुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

  मनमाड रोड परिसरात सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सावेडी बस स्थानकाच्या भूमिपूजन समारंभात पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.

कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उप महापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

   पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सावेडी परिसरात आधुनिक बस स्थानक उभारणे आवश्यक झाले होते. या बस स्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक वातानुकूलित बसेस तसेच पर्यावरणपूरक ई-बसेस सुरू केल्या असून प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असून महामंडळ अधिक लोकाभिमुख होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह तसेच इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकसहभागातून उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमास पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण