vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जालना, प्रतिनिधी)- १२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीबाबत पुनर्विचार करुन आधार कार्ड वापरण्यात यावा नसता शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,इशाराही जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवेसना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,

जिल्हाप्रमुख महेश नळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुखभगवान कदम, हनुमान धांडे,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे,शहरप्रमुख दिपक रननवरे, महेश पुरोहित, अनिस पठाण, दिनेश काकडे,सुरेशराणा, परमेश्वर मात्रे, अंकुशराव वाघ, फेजान मिर्झा यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होतशिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत महिलांसाठी प्रवास सवलतीसाठी स्मार्ट,कार्ड योजना राबविण्यात येत आहे. ही योजना स्तुत्य असली तरी १२ ते ६५वयोगटातील सर्व महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याबाबत काहीव्यावहारिक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना,स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया व,केंद्रांपर्यंत पोहोचणे हे अनेकदा कठीण ठरते. तसेच, तांत्रिक अडचणी,नेटवर्क समस्या आणि कार्ड हटवणे/बिघडणे यामुळे प्रवासात अडथळे निर्माणहोतात. अनेक महिला दैनंदिन मजुरी करणार्‍या असल्याने त्यांना वेळ काढणेही कठीण जाते.१२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायीव्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा. ओळखपत्राच्या आधारेसवलतीचा लाभ मिळण्याची सुविधा सुरु ठेवावी. ग्रामीण भागात अधिक नोंदणीकेंद्रे व सोपी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी. तांत्रिक अडचणी दूर,करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. आपण या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन महिलांना सोयीस्कर व सुलभ अशी व्यवस्था उपलब्ध करून द्याल,अशी अपेक्षा आहे.

महिलांकडे आधार कार्ड असल्याकारणाने त्यांना महिला असल्याचा पुरावा हाग्राह्य धरण्यात यावा. नाहक महिलांकडून २०० ते २५० रुपये वसूल करण्यातयेऊ नये.याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा नसता शिवसेनेच्या वतीनेतीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवरराहील, असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे

संबंधित पोस्ट

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर च्या वतीने महाप्रशिक्षण अभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न

vishwatmaklokswamivarta

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta