vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

      अमरावती, प्रतिनिधी  नुकत्याच शांघाय, चीन येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशिप’ स्टेज 2 स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते कुमकुमचा शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

   जागतिक स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना 4-4 असा बरोबरीने सुटला होता. त्यानंतरच्या ‘शूट-ऑफ’मध्ये कुमकुमने अचूक लक्ष्यभेद करीत चीनला पराभूत केले. या कामगिरीने भारतीय महिला संघाने 5 वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक पटकाविले. उपांत्य फेरीतही भारतीय संघाने 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत केले. या सुवर्णविजेत्या भारतीय संघात कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि 4 वेळची ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता.

   कुमकुम ही गेल्या 9 वर्षांपासून अमरावती जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, ‘खेलो इंडिया’ आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या फॉर्मात असून, तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज 03, स्पेन (माद्रिद) येथील वर्ल्ड कप स्टेज 4 आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुमकुमसोबतच अमरावतीचा यशदीप भोगे याची देखील आशियाई गेम्ससाठी निवड झाली आहे.

    कुमकुमच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कुमकुमची लहान वयातील ही कामगिरी पाहता, ती 2028 मध्ये लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाचे नाव लौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, क्रीडा मार्गदर्शक. प्रफुल्ल डांगे उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज- आशिष फुलुके- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल – खासदार नरेश म्हस्के ‘ नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

vishwatmaklokswamivarta