vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

      अमरावती, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषधी विजेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषधविक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहे.

 बंदच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडीत व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केली आहे. सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्र औषध दुकाने, तसेच 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकानांनी समन्वय साधण्यात येत आहे. यात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले ओ. अन व औषध प्रशासन, अमरावती कार्यालया हेल्पलाईन क्रमांक – गजानन घीरके, सहायक आयुक्त (औषधे) वाशिम, अमरावती-९८५०१५०६८७, मनिष गोतमारे, औषध निरीक्षक, वाशिम, अमरावती ९५५२५७४४९५, तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पन्नाईन क्रमांक – अमरावती शहर – प्रविण देशमुख 9422158409, संजय बोबडे 9422157615, सौरभ मालानी 9423812345, मनोज डफळे 9823205250, राजा नानवाणी 9822643226 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) करण्यात मि. कृ. काळेश्वरकर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती