vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा प्रतिनिधी- शाळा या जीवन शिक्षण देणारी मंदिर असल्यामुळे शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

प्रतापसिंह हायस्कूल येथे आज वागत विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव २०२६ कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. नगर सेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याधपक व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी नक्कीच काही विद्यार्थी देश पातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल करतील. प्रतापसिंह हायस्कुलला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे प्रकांड पंडित या शाळेने घडविले आहेत. तसेच मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर, यांच्यासह अनेक उद्योजक, कृषितज्ज्ञ नेते या शाळेने घडविले आहेत. शाळेचे नाव उज्ज्वल करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आज उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी भविष्यात आय. ए. एस. व्हावे आणि असाच कार्यक्रम घ्यावा अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे आणि देश पातळीवर शाळेचे नाव उंचवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

यावेळी दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्त भाषण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

0000

 

संबंधित पोस्ट

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

vishwatmaklokswamivarta

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू