vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी 

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी

 

नांदेड प्रतिनिधी:- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल व पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते.

तसेच, पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करून बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. कमी उगवणक्षम बियाणे वापरल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळत नाही व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, बियाण्यांना बुरशीजन्य व कीडजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचा वापर करावा, संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणीचे नियोजन करावे. योग्य नियोजन, शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा अवलंब आणि हवामानानुसार निर्णय घेतल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित व यशस्वी खरीप हंगामासाठी तयारी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

vishwatmaklokswamivarta

सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ* 

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

संस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे-: अश्विनी पांचाळ मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, कुठलाही तणाव घेऊ नका-: मानसी नोपानी

vishwatmaklokswamivarta