vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी 

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी

 

नांदेड प्रतिनिधी:- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल व पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते.

तसेच, पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करून बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. कमी उगवणक्षम बियाणे वापरल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळत नाही व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, बियाण्यांना बुरशीजन्य व कीडजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचा वापर करावा, संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणीचे नियोजन करावे. योग्य नियोजन, शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा अवलंब आणि हवामानानुसार निर्णय घेतल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित व यशस्वी खरीप हंगामासाठी तयारी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन