vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

बुलढाणा, प्रतिनिधी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध फलोत्पादन, संरक्षित शेती, मशरूम उत्पादन, शेततळे, मधुमक्षिका पालन, कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक व प्रक्रिया प्रकल्पांसह अनेक घटकांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

योजनेअंतर्गत फळबाग लागवड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, केळी, पपई, अवोकॅडो आदी फळपिके, रोपवाटिका, अळिंबी उत्पादन प्रकल्प, फुलशेती, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिका पालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध प्रकारचे स्प्रेअर, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह अशा एकूण २९ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या घटकांसाठी पात्रतेनुसार ४० टक्के ते ५० टक्के अर्थसहाय्य तसेच काही घटकांसाठी प्रतियुनिट किंवा प्रतिहेक्टर लाखो रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष देय अनुदान संबंधित घटकाच्या मंजूर निकषांनुसार निश्चित करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जांची निवड “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थ्याकडे अनुसूचित जातीचे वैध जात प्रमाणपत्र व फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी (मोका तपासणी) करून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संबंधित घटकासाठी यापूर्वीच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित गावातील उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

भारताने मेरठ येथील आरव्हीसी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे रोगमुक्त क्षेत्र केले स्थापन

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ,श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

धनगर समाजाच्या हक्कासाठी निर्णायक टप्पा – अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन!- प्रमोद वाघमोडे

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta