vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रशासकीय उपाययोजना सुरु झाल्या आहेत.या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) समृत जाधव यांची विशेष मुलाखत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन रविवार दि.१२ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत समृत जाधव यांनी या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बातचीत केली आहे.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे कार्यक्रम अधिकारी सुजीत बनसोडे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ही मुलाखत अत्यंत उद्बोधक व माहितीपुर्ण असून शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी अवश्य ऐकावी. श्रोत्यांना एफ.एम. 101.7 Mhz या वाहिनीवर ही मुलाखत ऐकता येईल आणि News on AIR ॲप वर ही मुलाखत देशभरात कोठेही ऐकता येणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

१५३ सायकलस्वार. एक राष्ट्र. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांनी बाकर नासेरच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी स्पिनला बळ 

मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळाला ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा गुरनोलीत ग्रामस्थांशी थेट संवाद

नियतकालीक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वर्षिक सर्वेक्षण (ASUSE) 2026 करीता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रगणकांना अचूक माहिती देणेचे आवाहन