vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कश्मीर मध्ये दहशतवादी अल्पसंख्याक हिंदू,शीख,समुदायातील नागरिकांना लक्ष्य करतात. काश्मीर पोलीस

कश्मीर मध्ये दहशतवादी अल्पसंख्याक हिंदू शीख आणि इतर  समुदायातील  नागरिकांना लक्ष्य करत आहे,काश्मीरचे पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली प्रतिनिधी  : गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये २८ नागरिकांचा दहशतवादी  हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरला लक्ष्य केलं असून गेल्या आठवड्यापासून सात नागरिकांचा बळी गेला आहे. या २८ नागरिकांपैकी पाच व्यक्ती ही शिख समुदायाची होती, तर २ व्यक्त बाहेरच्या राज्यातील हिंदू मजूर होते. तसेच गुरुवारी देखील दहशतवाद्यांनी ईदगाह परिसरात शाळेवर गोळीबार केला. यामध्ये एक शिख सुमदायाच्या मुख्याध्यापिका आणि एक काश्मीरी पंडीत शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. सध्या दहशतवादी अल्पसंख्याक समुदायातील  नागरिकांना लक्ष्य करत आहेत. याबाबत काश्मीरचे पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी माहिती दिली आहे.

”मारले गेलेले दहशतवादी, विशेषत: त्यांचे नेतृत्व, त्यांच्या सहाय्यक संरचनांचा नाश आणि कायदा व सुव्यवस्थेची सतत आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे दहशतवाद्यांमध्ये निराशा आहे. त्यामधूनच हे हल्ले झाले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांची रणनिती बदलली असून त्यांनी निःशस्त्र महिला, पोलिस, नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे”, असे कुमार यांनी हिंदूस्थान टाईम्ससोबत बोलताना सांगितले. ”अशा सर्व घटनांमध्ये दहशतवादी पिस्तूल वापरत असून नव्याने भरती झालेले दहशतवादी किंवा सध्या दहशतवाद्यांमध्ये सामील होण्याच्या मार्गावर असलेल्या आरोपींचा या घटनांमध्ये समावेश आहे. काही घटनांमध्ये स्थानिक कामगारांचा देखील समावेश असल्याचे आढळून आले आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांवर पोलिसांची करडी नजर असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहोत. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुमार यांनी दिले. काश्मीरमधील अल्पसंख्याक नागरिकांनी घाबरू जाऊ नये. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत”, असेही कुमार म्हणाले. ईदगाह परिसरात नेमकं काय घडलं?-दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील इदगाह परिसरातील शाळेवर गुरुवारी गोळीबार केला. यावेळी शिक्षकांना ओळखपत्राची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांना विरोध केला असता गोळ्या झाडून ठार केले. यामध्ये ठार झालेल्या मुख्याध्यापिकेचं नाव सतिंदर कौर असून शिक्षकाचे नाव दीपक चांद असं आहे.

संबंधित पोस्ट

सर्वात मोठ्या फिल्म सिटीचे संस्थापक हैदराबादमध्ये रामोजी राव यांचं निधन,वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीत निर्णय घेतले आहेत

शिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल..

vishwatmaklokswamivarta

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ,रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ