vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले**’मागेल त्याला काजू’ व व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत काजू व आंबा घन लागवडीचा शुभारंभ*

*फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले**’मागेल त्याला काजू’ व व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत काजू व आंबा घन लागवडीचा शुभारंभ*

रायगड-अलिबाग प्रतिनिधी)-पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीसारख्या शाश्वत पर्यायांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आंबा, काजू यांसारख्या फळपिकांची लागवड करावी. कृषी व फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले.

मौजे विन्हेरे येथे किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर ‘मागेल त्याला काजू’ योजनेअंतर्गत ०.२० हेक्टर क्षेत्रावर सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून काजू लागवडीचा, तर मौजे नातोंडी येथे ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत ०.२५ हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा शुभारंभ रोजगार हमी मंत्री श्री. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, पंचायत समिती सभापती श्रीमती सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. खिडबिडे, श्रीमती म. माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकळे, तहसीलदार श्री. शितोळे, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. गोगावले म्हणाले की, अनेक ठिकाणी शेती पडिक राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनीवर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करावेत. व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत आंबा घन लागवडीसाठी १०० झाडांपर्यंत सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने फळबाग विकसित करावी. कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणा शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शासनाची ‘मागेल त्याला काजू’ ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. काजू हे दीर्घकाळ शाश्वत उत्पन्न देणारे पीक असून त्याचे नुकसान जनावरांकडून तुलनेने कमी होते. या योजनेअंतर्गतही शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन काजू लागवड करावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. फळबाग लागवड ही भविष्यातील शेतीसाठी महत्त्वाची दिशा असून या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*******

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या; यात मुंबईतल्या CSMT येथून ९८ तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६आरक्षित गाडया सोडण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात  – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल..