vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकाशवाणी, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नौसेना स्वरवंदना’ या संगीतमय कार्यक्रमाचे बुधवार, दि. 12 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. ‘वंदेमातरम्’ गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून नौदलाच्या पश्चिम कमांडच्या वाद्यवृंदाचे 65 कलाकार एकत्रितपणे ही अनोखी स्वरवंदना साकारणार आहेत.

नौसेनेतील स्लो मार्च, क्विक मार्च संगीतासह काही देशभक्तीपर गीतांचा या कार्यक्रमात समावेश असून नौसेनेच्या वाद्यवृंदाची लयबद्ध, सुरेल अनुभूती यातून प्रेक्षकांना निश्चितपणे मिळू शकेल. संगीताचे सूर हे जनमानसासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात. स्वातंत्र्य लढ्यात समरगीते आणि देशभक्तीपर गीतांनी जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. देशभक्तीपर समूहगीतांच्या माध्यमातून आकाशवाणीनेही ही परंपरा मागील अनेक दशकांपासून जपली आहे. नेव्हल बँड अर्थात नौसेना वाद्यवृंद देखील हेच कार्य अनेक वर्षांपासून करीत आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या भव्य रंगमंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्तीच्या या सुरेल सोहळ्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

००००

 

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर…**नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चा समारोप

vishwatmaklokswamivarta

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा, स्फोट झालेल्या गाडीत डॉ.उमर असल्याचं डीएनए टेस्टवरुन झालं स्पष्ट

vishwatmaklokswamivarta