
मुंबई महानगरपालिकेलापवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प, कोट्यावधीचा फटका…
मुंबई – प्रतिनिधी पवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प पडले आहे. भुगर्भाचा अंदाज चुकल्याने महानगर पालिकेला हा फटका बसला आहे. आता या अर्धवट कामासाठी महानगर पालिकेला 147 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च (Loss) कंत्राटदाराला द्यावा लागणार आहे. अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. तसेच, पुढील कामासाठी नव्याने निवीदा मागविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष 223 कोटी 15 लाख रुपयांच्या मुळ खर्चात आता काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे.महानगर पालिकेने पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम 2012 मध्ये सुरु केले. हे काम 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षीत असताना भुस्तराअंतर्गत प्रतिकुल परीस्थीतीमुळे कामात अडथळे आले. तर, ऑगस्ट 2019 मध्ये पवई येथील शिपींग कार्पोरेशन जवळ खोदकाम सुरु असताना जमिन खचून खड्डा निर्माण झाला. त्यामुळे हे मशिन जमिनीखालील चिखलात अडकले. तेव्हा पासून हे मशिन अडकून आहे. जगात दोन ठिकाणीच असा प्रकार घडला आहे. पवई पासून 1 हजार 206 मिटरचे काम या काळात पुर्ण झाले होते.



