
BMC ची निवडणुक जिंकणारच ! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आत्मविश्वास
मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यातल्या चर्चेमुळे रविवारचा दिवस चांगलाच गाजला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून यावरुन राजकीय वर्तुळातही चांगल्याच चर्चा रंगल्या. या बैठकीच्या निमीत्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची चर्चाही रंगताना पहायला मिळाली.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी KCR यांच्यासोबतच्या बैठकीतून आपली तब्येत व्यवस्थित असून आगामी BMC ची निवडणुक आपण जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
चंद्रशेखर राव यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी आपली तब्येत आता बरी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पत्रकारांना कधी भेटणार असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी BMC ची निवडणुक आम्ही जिंकणारच पण त्याआधीही मी तुमच्याशी बोलेन असं म्हणत विरोधकांना उत्तर दिलं.



